तरी तुझी आठवण येते
पानगळीनं झुरत जातो
रक्त मातीत जिरत जातं
जंतुंसारख्या वळवळणाऱ्या
जाणीवाही मरत जातात
आभाळ पायाखाली दाबून
पृथ्वी डोक्यावरती घेऊन
आयुष्याची नाली चिवडत
पोथीपानं चाळत जातो
व्याघ्रगुहा प्रकाशलेली
वाघ तमी झोपलेला
जंगल जळत असतांनाही
पाणी कुठून गळत नाही
हात नसलेल्यांच्या टोळ्या
असणारांचे हात घेतात
फूल काट्यांच्याच ताब्यात
बाण हृदयात टोचत जातात
अशी आजची मृगतृष्णा
डोकं माझं विकत घेते
तुझ्या स्मृतीस अळ्या पडतात
तरी तुझी आठवण येते
~राजीव मासरूळकर
दि १५.४.१२
पानगळीनं झुरत जातो
रक्त मातीत जिरत जातं
जंतुंसारख्या वळवळणाऱ्या
जाणीवाही मरत जातात
आभाळ पायाखाली दाबून
पृथ्वी डोक्यावरती घेऊन
आयुष्याची नाली चिवडत
पोथीपानं चाळत जातो
व्याघ्रगुहा प्रकाशलेली
वाघ तमी झोपलेला
जंगल जळत असतांनाही
पाणी कुठून गळत नाही
हात नसलेल्यांच्या टोळ्या
असणारांचे हात घेतात
फूल काट्यांच्याच ताब्यात
बाण हृदयात टोचत जातात
अशी आजची मृगतृष्णा
डोकं माझं विकत घेते
तुझ्या स्मृतीस अळ्या पडतात
तरी तुझी आठवण येते
~राजीव मासरूळकर
दि १५.४.१२
No comments:
Post a Comment