सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

तरी तुझी आठवण येते

तरी तुझी आठवण येते

पानगळीनं झुरत जातो
रक्त मातीत जिरत जातं
जंतुंसारख्या वळवळणाऱ्‍या
जाणीवाही मरत जातात

आभाळ पायाखाली दाबून
पृथ्वी डोक्यावरती घेऊन
आयुष्याची नाली चिवडत
पोथीपानं चाळत जातो

व्याघ्रगुहा प्रकाशलेली
वाघ तमी झोपलेला
जंगल जळत असतांनाही
पाणी कुठून गळत नाही

हात नसलेल्यांच्या टोळ्या
असणारांचे हात घेतात
फूल काट्यांच्याच ताब्यात
बाण हृदयात टोचत जातात

अशी आजची मृगतृष्णा
डोकं माझं विकत घेते
तुझ्या स्मृतीस अळ्या पडतात
तरी तुझी आठवण येते

~राजीव मासरूळकर
दि १५.४.१२

No comments:

Post a Comment