सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

खरपूस

माणूस नाही

गोडवा संपून गेला, ती चिपाडे, ऊस नाही
क्रूरतेने वागतो जो , तो पशू , माणूस नाही !

मायभू आधार देते , कास्तकाराच्या पिकांना
सावलीचे सोंग घेतो तो खरा पाऊस नाही !

पापपुण्याला विरक्तीला जरासा अर्थ देऊ
दान गरजूलाच देऊ, देव वा साधूस नाही

घण जरा आवर, समीक्षा स्पर्शुनी शब्दांस तू कर
लागला चटका न तर म्हण, ही गझल खरपूस नाही

जिंकल्या लाखो लढाया, घाव छातीवर मिरवले
ही कशी आता निरवता... स्पंदनी धुडगूस नाही.... ?

- राजीव मासरूळकर
  दि.10/12/2013

No comments:

Post a Comment