अटळ
घाव होऊ नये वा उठावा न वळ
फक्त यावी उरी एक साधीच कळ
बोललो मी मला काय बोलायचे
बोल तूही मनातील थोडे सरळ
राग मानू नको, दूर जाऊ नको
फार असते कठिण परत येणे जवळ
फूल चुरगाळणे सोड वेड्या अता
गंध आहे तुझ्यातच खरा, तो उधळ
नाव यादीत माझे तुझ्या घेच पण
ती असेतो यमा नाव माझे वगळ
रंग काळा म्हणे पांढ-याला, बघू
कोण आहे उजळ, कोण आहे उथळ
अंत आहे सुखाला कुठे या जगी
दु:ख आहे तरी माणसाचे अटळ!!!
~राजीव मासरूळकर
दि.24/05/2015
रात्री11:55 वाजता
सिल्लोड, औरंगाबाद
घाव होऊ नये वा उठावा न वळ
फक्त यावी उरी एक साधीच कळ
बोललो मी मला काय बोलायचे
बोल तूही मनातील थोडे सरळ
राग मानू नको, दूर जाऊ नको
फार असते कठिण परत येणे जवळ
फूल चुरगाळणे सोड वेड्या अता
गंध आहे तुझ्यातच खरा, तो उधळ
नाव यादीत माझे तुझ्या घेच पण
ती असेतो यमा नाव माझे वगळ
रंग काळा म्हणे पांढ-याला, बघू
कोण आहे उजळ, कोण आहे उथळ
अंत आहे सुखाला कुठे या जगी
दु:ख आहे तरी माणसाचे अटळ!!!
~राजीव मासरूळकर
दि.24/05/2015
रात्री11:55 वाजता
सिल्लोड, औरंगाबाद