सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

अटळ

अटळ

घाव होऊ नये वा उठावा न वळ
फक्त यावी उरी एक साधीच कळ

बोललो मी मला काय बोलायचे
बोल तूही मनातील थोडे सरळ

राग मानू नको, दूर जाऊ नको
फार असते कठिण परत येणे जवळ

फूल चुरगाळणे सोड वेड्या अता
गंध आहे तुझ्यातच खरा, तो उधळ

नाव यादीत माझे तुझ्या घेच पण
ती असेतो यमा नाव माझे वगळ

रंग काळा म्हणे पांढ-याला, बघू
कोण आहे उजळ, कोण आहे उथळ

अंत आहे सुखाला कुठे या जगी
दु:ख आहे तरी माणसाचे अटळ!!!

~राजीव मासरूळकर
   दि.24/05/2015
   रात्री11:55 वाजता
    सिल्लोड, औरंगाबाद

No comments:

Post a Comment