2012 मध्ये गांधी घराण्याच्या (सरकारी) जावयाच्या भ्रष्टाचार प्रकरणानंतर सुचलेली ही कविता शेतक-यांना 'साले' म्हणणा-या दानवेंनाही तितकीच लागू पडते.......
करी राजकारण , मनी मोह ल्याले
लकी ड्रॉ , लिलावावरी देश चाले !
लवे , हात जोडे , बसे वाकळीवर
बघा ते खजीना लुटायास आले !
मते मोजुनी जे खिसा ओतताती
कळो ते जगाला विकाया निघाले !
समाजाप्रती ना कुणा काज चिंंता
खरे कार्यकर्ते तळाशी बुडाले !
खिळे नोकरांना विळे पामरांना
सग्यासोयऱ्यांना मिळे लांब भाले !
नको खंत राजीव मांडू विरोधी
तुला देशद्रोही ठरवतील साले !
- राजीव मासरूळकर
7.10.2012, 9.55PM
rajivmasrulkar@gmail.com
करी राजकारण , मनी मोह ल्याले
लकी ड्रॉ , लिलावावरी देश चाले !
लवे , हात जोडे , बसे वाकळीवर
बघा ते खजीना लुटायास आले !
मते मोजुनी जे खिसा ओतताती
कळो ते जगाला विकाया निघाले !
समाजाप्रती ना कुणा काज चिंंता
खरे कार्यकर्ते तळाशी बुडाले !
खिळे नोकरांना विळे पामरांना
सग्यासोयऱ्यांना मिळे लांब भाले !
नको खंत राजीव मांडू विरोधी
तुला देशद्रोही ठरवतील साले !
- राजीव मासरूळकर
7.10.2012, 9.55PM
rajivmasrulkar@gmail.com
No comments:
Post a Comment