सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Saturday, 27 May 2017

कवी

कवी

ग्रामीण कवी
चारचाकीत बसून
कवीसंमेलनासाठी
शहरातून
गावात येतो...
दारिद्र्याच्या
शेतीमातीच्या
आत्महत्येच्या
त्यावर होणा-या राजकारणाच्या
त्याच त्या
चार कविता ऐकवतो
अन् जागवतो आशावाद...
गोळा झालेलं गाव
करतं टाळ्यांचा कडकडाट...
शहरापेक्षा
गावातच मिळतो मोठा प्रेक्षकवर्ग
अन् मिळते मोठी दाद
असं पुन:पुन्हा मनावर गोंदवून
कवीसंमेलनानंतरचा
पाहूणचार आटोपून
मानधन नको, तर
गाडीत तेल भरायला का होईना
गावानं दिलेलं पाकीट
जड अंत:करणानं
खिशात कोंबून
आल्या चारचाकीतूनच
शहराकडे निघून जातो
ग्रामीण कवी.....

गावही मग
झालं गेलं विसरून
शेतीमातीत गुंग होऊन
जगत राहतं
आपल्याच गतीत..

~ राजीव मासरूळकर
   27/5/2017 02:20 pm

No comments:

Post a Comment