सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 22 May 2017

भाते


घरघर करुनी फिरत राहते घासाशिवाय जाते
जीवन जळते , वणव्यामध्ये जणु गवताचे पाते !

कुठली शिल्लक , ठेव , बचत नी कुठली आणेवारी
डोहामध्ये मीन बुडावा , कर्ज जीवाला खाते !

चेहऱ्‍यावरी चढवुन घेतो नवे मुखोटे खोटे
अंतर्हृदयातून निसटते पण जपलेले नाते !

प्रेम जाळते , छळते , कळते,जडते तरी कुणावर
जातो सोडुुन कृष्ण , राधिका तरी विराणी गाते !

अंध अपंगा , पॉलीशवाल्याला 'ना' म्हणती सगळे
नाव झळकते तिथे ओतती खिसे आजचे दाते !

अहिंसकांना शांतिदुतांना लोकशाहीस ठोकर
बलात्कार देशावर करती भारतभाग्यविधाते !

वाग्बाणांना आवर सावर वापर बुद्धी राजू,
मारतील मन आणि माणसे ठरतिल नुसते भाते !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
दि १३.१०.२०१२

No comments:

Post a Comment