बाप्पा ,
यंदा मान्सून आला
तसाच गेला आणि तूसुद्धा तसाच चाललास .
पिकांकडे पाहून शेतकऱ्यांचा उरात जाळ भडकतोय . कर्जाचे डोंगर हाडं पोखरताहेत त्यांचे .
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला तरी पिण्याचं पाणी हातपाय खोरायला लावणार असं दिसतं .
तू जातोय बाबा मोठ्या जल्लोषात , पण
बघ जाता जाता एवढं विघ्न टाळता आलं तर .
आता तरी पाऊस पाड !
तू बुद्धीचा देव ! जगभरातल्या अव्वल ४०० विद्यापिठांच्या यादीत भारताचं एकही विद्यापीठ नाही हे निश्चितच सुखकारक नाही ना ?
जाता जाता आम्हाला थोडीतरी बुद्धी दे !
दररोज लाखो कोटींचे घोटाळे होताहेत , काही उघडही होताहेत ! देशाचा एकंदरीत कारभारच लिलाव आणि लकी ड्रॉ पद्धतीनं चालला आहे .
तुझ्या विचारांकडे दुर्लक्ष करून केवळ तू नवसाला पावतोस या एकाच लालसेपायी तुझ्यासमोर रांग लागते , हे तुला पहावतं तरी कसं ? भारतीय भ्रष्टाचाराचं मूळ असलेली नवसपद्धती तूच पुढे नेत राहशील तर हर्षद मेहतांपासून कलमाडी किँवा कालपर्यंत उघड झालेल्या नावकऱ्यांना दोष तरी कसा द्यावा आम्ही ?
जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ देश चालवत असूनही आमचा रूपया गडगडला आहे . आर्थिक विकास थांबला आहे . FDI चं गाजर चघळूनही गोड लागेलंसं वाटत नाहीय . सत्तेचा डोलारा कधी कोसळेल याचा काही नेम नाही . येणाऱ्या काळात आम्ही राजकीय स्थैर्य गमावून बसणार अशी शंका घेण्यासारखं वातावरण आहे .
आमच्या पुण्यनगरीतली चिल्लर पार्टी आधुनिक भारतीय समाजाचं नवं थिल्लर रूप समोर उभं करीत आहे .
मोबाईल , कंप्युटर , इंटरनेटचा वापर भलत्याच भानगडींसाठी करून आमची नवी पिढी स्वातंत्र्याचे ढेकर देत आहे .
ऑलंपिक स्पर्धांत १२१ कोटींमधून ६ माणसं पदक मिळवतात हे मागील इतिहास पाहता अभिमानास्पद वाटत असलं तरी खंडप्राय देशातील खरब खंडीभर जनता बघता लज्जास्पदच नाही काय ?
कालच आमचा क्रिकेट संघ तुझ्या कृपाछत्राखाली खेळूनही चारी मुंड्या चित झाला हे त्यातल्या त्यात ताजं उदाहरण !
बाप्पा ,
कृषी क्षेत्रात , सामाजिक , आर्थिक , राजकीय , क्रीडा , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात भारत केवळ लोटांगण घेत आहे . जनता तर केव्हाच आडवी झाल्यासारखी वाटतेय .
जाता जाता याकडेही थोडी नजर फिरवून जा रे बाबा ! ! ! !
तुझाच आंधळा भक्त ,
राजीव .
दि.29/09/2012
मनमोहन सिंग सरकारचा पडतीचा काळ
यंदा मान्सून आला
तसाच गेला आणि तूसुद्धा तसाच चाललास .
पिकांकडे पाहून शेतकऱ्यांचा उरात जाळ भडकतोय . कर्जाचे डोंगर हाडं पोखरताहेत त्यांचे .
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला तरी पिण्याचं पाणी हातपाय खोरायला लावणार असं दिसतं .
तू जातोय बाबा मोठ्या जल्लोषात , पण
बघ जाता जाता एवढं विघ्न टाळता आलं तर .
आता तरी पाऊस पाड !
तू बुद्धीचा देव ! जगभरातल्या अव्वल ४०० विद्यापिठांच्या यादीत भारताचं एकही विद्यापीठ नाही हे निश्चितच सुखकारक नाही ना ?
जाता जाता आम्हाला थोडीतरी बुद्धी दे !
दररोज लाखो कोटींचे घोटाळे होताहेत , काही उघडही होताहेत ! देशाचा एकंदरीत कारभारच लिलाव आणि लकी ड्रॉ पद्धतीनं चालला आहे .
तुझ्या विचारांकडे दुर्लक्ष करून केवळ तू नवसाला पावतोस या एकाच लालसेपायी तुझ्यासमोर रांग लागते , हे तुला पहावतं तरी कसं ? भारतीय भ्रष्टाचाराचं मूळ असलेली नवसपद्धती तूच पुढे नेत राहशील तर हर्षद मेहतांपासून कलमाडी किँवा कालपर्यंत उघड झालेल्या नावकऱ्यांना दोष तरी कसा द्यावा आम्ही ?
जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ देश चालवत असूनही आमचा रूपया गडगडला आहे . आर्थिक विकास थांबला आहे . FDI चं गाजर चघळूनही गोड लागेलंसं वाटत नाहीय . सत्तेचा डोलारा कधी कोसळेल याचा काही नेम नाही . येणाऱ्या काळात आम्ही राजकीय स्थैर्य गमावून बसणार अशी शंका घेण्यासारखं वातावरण आहे .
आमच्या पुण्यनगरीतली चिल्लर पार्टी आधुनिक भारतीय समाजाचं नवं थिल्लर रूप समोर उभं करीत आहे .
मोबाईल , कंप्युटर , इंटरनेटचा वापर भलत्याच भानगडींसाठी करून आमची नवी पिढी स्वातंत्र्याचे ढेकर देत आहे .
ऑलंपिक स्पर्धांत १२१ कोटींमधून ६ माणसं पदक मिळवतात हे मागील इतिहास पाहता अभिमानास्पद वाटत असलं तरी खंडप्राय देशातील खरब खंडीभर जनता बघता लज्जास्पदच नाही काय ?
कालच आमचा क्रिकेट संघ तुझ्या कृपाछत्राखाली खेळूनही चारी मुंड्या चित झाला हे त्यातल्या त्यात ताजं उदाहरण !
बाप्पा ,
कृषी क्षेत्रात , सामाजिक , आर्थिक , राजकीय , क्रीडा , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात भारत केवळ लोटांगण घेत आहे . जनता तर केव्हाच आडवी झाल्यासारखी वाटतेय .
जाता जाता याकडेही थोडी नजर फिरवून जा रे बाबा ! ! ! !
तुझाच आंधळा भक्त ,
राजीव .
दि.29/09/2012
मनमोहन सिंग सरकारचा पडतीचा काळ
No comments:
Post a Comment