दिवस ढकलत जगत आहोत हल्ली
आपल्या जगण्यात आपलं अस्तित्वच आढळत नाहिये मुळी
आपण आपणच आहोत का असा प्रश्न पडावा
इतकं अनोळखीपण यावं
ही कुठल्या धोक्याची घंटा आहे...?
घंटाच झालंय जगणं जणु
कुणीही यावं वाजवून जावं
कोरडेठाक झालो आहोत नुसतं
या कोरड्या कवितेतल्या कोरडपडल्या शब्दांसारखेच...
डोळ्यांसमोर
डोळ्यांतून मेंदूत शिरावं
असं काही घडतच नाहीये हल्ली
कि डोळ्यांचं सेंसरच बिघडलंय आपल्या?
किती दिवस झाले असतील
डोळ्यांत एखादा अश्रू यायला
आठवत नाही
अपघातबलात्कारखूनआत्महत्याभाषणंमोर्चेचर्चा
सगळं सगळं फालतूपणा या व्याख्येत लोटून मोकळं होता येतंय सध्या
डोक्याला टेन्शन नकोय बिल्कुल कशाचंच...
मोबाईलच्या स्क्रिनवर
झळकत राहतात
ख-याखोट्या मित्रमैत्रिणींचे
नातेवाईकांचे सहका-यांचे बरेवाईट मेसेजेस
डोळ्यांत नवी झळाळी यावी
इतकं जिवंत वाटतंच नाही काही
काहीतरी उत्तर द्यावं म्हणून
मृत स्मायलीज पाठवून होतात यांत्रिकपणे
(यांत्रिकपणाच्याही पुढची पातळी गाठली गेलीय
पण आपल्याला तो शब्द सुचायचा बाकीय अजून)
इतके मूक होत चाललो आहोत आपण दिवसेंदिवस
कुतुहल वाटावं असं काही दिसतच नाहीय
हे एकाकीपण
वैयक्तिक स्वातंत्र्याचं अपत्य आहे
कि ग्लोबलायझेशनचं?
दिवस ढकलत जगत आहोत हल्ली
ही कोणत्या युगाची नांदी आहे?
~ राजीव मासरूळकर
सावंगी, औरंगाबाद
दि.05/01/2019
आपल्या जगण्यात आपलं अस्तित्वच आढळत नाहिये मुळी
आपण आपणच आहोत का असा प्रश्न पडावा
इतकं अनोळखीपण यावं
ही कुठल्या धोक्याची घंटा आहे...?
घंटाच झालंय जगणं जणु
कुणीही यावं वाजवून जावं
कोरडेठाक झालो आहोत नुसतं
या कोरड्या कवितेतल्या कोरडपडल्या शब्दांसारखेच...
डोळ्यांसमोर
डोळ्यांतून मेंदूत शिरावं
असं काही घडतच नाहीये हल्ली
कि डोळ्यांचं सेंसरच बिघडलंय आपल्या?
किती दिवस झाले असतील
डोळ्यांत एखादा अश्रू यायला
आठवत नाही
अपघातबलात्कारखूनआत्महत्याभाषणंमोर्चेचर्चा
सगळं सगळं फालतूपणा या व्याख्येत लोटून मोकळं होता येतंय सध्या
डोक्याला टेन्शन नकोय बिल्कुल कशाचंच...
मोबाईलच्या स्क्रिनवर
झळकत राहतात
ख-याखोट्या मित्रमैत्रिणींचे
नातेवाईकांचे सहका-यांचे बरेवाईट मेसेजेस
डोळ्यांत नवी झळाळी यावी
इतकं जिवंत वाटतंच नाही काही
काहीतरी उत्तर द्यावं म्हणून
मृत स्मायलीज पाठवून होतात यांत्रिकपणे
(यांत्रिकपणाच्याही पुढची पातळी गाठली गेलीय
पण आपल्याला तो शब्द सुचायचा बाकीय अजून)
इतके मूक होत चाललो आहोत आपण दिवसेंदिवस
कुतुहल वाटावं असं काही दिसतच नाहीय
हे एकाकीपण
वैयक्तिक स्वातंत्र्याचं अपत्य आहे
कि ग्लोबलायझेशनचं?
दिवस ढकलत जगत आहोत हल्ली
ही कोणत्या युगाची नांदी आहे?
~ राजीव मासरूळकर
सावंगी, औरंगाबाद
दि.05/01/2019
No comments:
Post a Comment