आम्ही गडावर आहोत
एवढे दिवस गडावरच काढावे लागतील असं वाटलं नव्हतं
गनिम मोठ्या फौजेसह आमच्याकडे चालून येत आहे
ही बातमी लागताच
आम्ही आमच्या अभेद्य गडावर सुरक्षित पोहोचलोत
आमच्या हेरांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच
पण फितुरी काही कमी नाहीय आमच्या राज्यात
आम्हाला गडावरून सोडवण्यासाठी
असंख्य मावळे लावताहेत प्राणाची बाजी
कित्येक पडताहेत धारातिर्थी
पण काळाचं भान अन् परिस्थितीची जाण नसलेले
हे अज्ञानी फितूर उठले आहेत आमच्या मुळावर
आणि आता गनिम हजाराचे पाच लाख होऊन
घालत आहे गडाला वेढा
मावळे देतायत कडवी झुंज
करताहेत जखमींवर उपचार
घालताहेत बेघरांच्या तोंडी दोन घास
शोधताहेत गनिमी काव्याचे नवे मार्ग
फंदफितुरीच्या नादात रस्त्यावर उतरलेल्यांना
लावताहेत परतवून
पण
जीवनावश्यक चिरीमिरीच्या मोहात पडून
रयत अडकतच चाललीय गनिमाच्या जाळ्यात
धारातिर्थी पडलेल्यांच्या प्रेतांचा खच पडायला सुरूवात होतेय
गनिमाच्या धाकाने देता येत नाहीय
आपल्यांनाच मूठमाती
गडावरील जनता हवालदिल होत चाललीय दिवसेंदिवस
पण आम्ही हरलेलो नाहीयोत अजून
आम्ही स्वत: दक्ष आहोत
रयतेला सांगताहोत दक्षता घ्यायला
गडावर राहून का होईना पुरवतो आहोत आवश्यक ती रसद
गरजू युद्धग्रस्तांपर्यंत
आणि मुख्य म्हणजे वाढवतो आहोत त्यांचं मनोबल
जमेल त्या पद्धतीनं...
तरीही
धर्म, राजकारण आणि विनाकारण फिरणारे फितुर
यांच्यापुढे आम्ही होत आहोत हतबल
या हतबलतेनं आमच्या अभेद्य गडाचाही
उडतोय थरकाप
पण आम्ही घाबरणारे नाहीयोत...
लढाई सुरूच आहे
आम्ही जिंकून दाखवूच.....!
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.15/04/2020
एवढे दिवस गडावरच काढावे लागतील असं वाटलं नव्हतं
गनिम मोठ्या फौजेसह आमच्याकडे चालून येत आहे
ही बातमी लागताच
आम्ही आमच्या अभेद्य गडावर सुरक्षित पोहोचलोत
आमच्या हेरांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच
पण फितुरी काही कमी नाहीय आमच्या राज्यात
आम्हाला गडावरून सोडवण्यासाठी
असंख्य मावळे लावताहेत प्राणाची बाजी
कित्येक पडताहेत धारातिर्थी
पण काळाचं भान अन् परिस्थितीची जाण नसलेले
हे अज्ञानी फितूर उठले आहेत आमच्या मुळावर
आणि आता गनिम हजाराचे पाच लाख होऊन
घालत आहे गडाला वेढा
मावळे देतायत कडवी झुंज
करताहेत जखमींवर उपचार
घालताहेत बेघरांच्या तोंडी दोन घास
शोधताहेत गनिमी काव्याचे नवे मार्ग
फंदफितुरीच्या नादात रस्त्यावर उतरलेल्यांना
लावताहेत परतवून
पण
जीवनावश्यक चिरीमिरीच्या मोहात पडून
रयत अडकतच चाललीय गनिमाच्या जाळ्यात
धारातिर्थी पडलेल्यांच्या प्रेतांचा खच पडायला सुरूवात होतेय
गनिमाच्या धाकाने देता येत नाहीय
आपल्यांनाच मूठमाती
गडावरील जनता हवालदिल होत चाललीय दिवसेंदिवस
पण आम्ही हरलेलो नाहीयोत अजून
आम्ही स्वत: दक्ष आहोत
रयतेला सांगताहोत दक्षता घ्यायला
गडावर राहून का होईना पुरवतो आहोत आवश्यक ती रसद
गरजू युद्धग्रस्तांपर्यंत
आणि मुख्य म्हणजे वाढवतो आहोत त्यांचं मनोबल
जमेल त्या पद्धतीनं...
तरीही
धर्म, राजकारण आणि विनाकारण फिरणारे फितुर
यांच्यापुढे आम्ही होत आहोत हतबल
या हतबलतेनं आमच्या अभेद्य गडाचाही
उडतोय थरकाप
पण आम्ही घाबरणारे नाहीयोत...
लढाई सुरूच आहे
आम्ही जिंकून दाखवूच.....!
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.15/04/2020
No comments:
Post a Comment