कवी कविता लिहिताहेत
कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
का लिहिताहेत कवी भरमसाठ कविता?
ज्येष्ठ प्रथितयश पुरस्कारप्राप्त साहित्यिक
समाजमाध्यमावर येऊन पाहताहेत
की भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
आणि मुख्य म्हणजे तोंड वर करून पुन्हा पुन्हा live सादरीकरण करून का मांडताहेत उच्छाद?
हे हौसेनवसे कवी का इतक्या कविता लिहून बदनाम करीत आहेत कवीकुळाला?
दररोज हजारो लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असताना
मुकाट आसवं गाळत श्रद्धांजली अर्पण करत बसण्याऐवजी
घरात बसून का लिहिताहेत हे कवी उथळ वगैरे कविता?
या हौशानवश्यांच्या कवितांमुळे
चांगल्या कवितेचं होत असलेलं प्रचंड नुकसान
अस्वस्थ करीत आहे पुरस्कारप्राप्तवगैरे प्रस्थापित साहित्यिकांना..
समीक्षक पडले आहेत भयंकर पेचात
की का लिहित असावेत कवी भरमसाठ कविता?
का लिहिताहेत हे वेडे लोक हातोहात
डॉक्टर्सवर, पोलिसांवर, मजूरांवर, राजकारण्यांवर, दात्यांवर, प्राणीपक्ष्यांवर, निसर्गावर
सर्रास सहजसुलभ कविता?
का करीत आहेत दीर्घकाळापासून घराघरात कोंडलेल्या
हवालदिल हतबल सामान्य रसिकांचं
उठल्याबसल्या live येऊन मोफत मनोरंजन?
या संख्यात्मक वाढीचा किती जबरदस्त फटका बसेल आपल्या अभिजात वगैरे भाषेला?
स्वत:च्या घरात दाळदाणा असो नसो
संकटग्रस्तांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्याऐवजी,
घरात स्वस्थ बसून टीव्हीवर सतत मृत्यूचा सोहळा
निर्विकारपणे बघत बसण्याऐवजी
का लिहिताहेत कवी लोकांच्या वेदनेवर, मरणावर इतक्या कविता?
थांबवायचं तरी कसं या जमेल तसं सरळसरळ लिहित्या हातांना
या प्रश्नाने पार भंडावून सोडलं आहे काळामागे धावताना प्रचंड दमछाक होत असलेल्या समीक्षकांना
वृत्तपत्र, नियतअनियतकालिकांचे संपादक
विभिन्न प्रकारची पुस्तकं छापणारे प्रकाशक विचारताहेत
की का लिहिताहेत हे भरमसाठ कवी भरमसाठ कविता?
वृत्तपत्र, नियतकालिकं , पुस्तकं घरोघर पोहोचवण्यावर निर्बंध असताना
वाचक मिळण्याची शक्यता नसताना
का विनाकारण लिहिताहेत कवी इतकी सडकछाप कविता?
आम्ही छापतो त्यांची कविता न वाचता
का वाचाव्यात, पहाव्यात संकटग्रस्त रसिकांनी
या हौशानवश्या कवींच्या हलक्याफुलक्या, आक्रोश मांडणा-या, वेदना देणा-या चिल्लर कविता?
समाजमाध्यमांसारख्या आभासी जगात कविता व्हायरल करून
का आपला वेळ आणि उर्जा वाया घालवत आहेत हे असहाय जीव?
कवी स्वत:ही संभ्रमात आहेत
कि का लिहिताहोत आपण इतक्या कविता?
शक्य तितकी मदत केली
शक्य त्यांना आधार दिला
शक्य तितका ब्रेकिंग न्युजचा भडिमार सोसला
शक्य तितकं गुपचूप गुदमरत बसलोत घरात
सगळं जग घरात बसलेलं असतानाही
का घडताहेत बाहेर या प्रचंड हालचाली?
का जाताहेत हकनाक असंख्य निष्पाप जीवांचे बळी?
का पसरलं आहे घराघरांवर मृत्यच्या भयाचं सावट?
का नाही थांबत आपली वेदनादायी विचारप्रक्रिया?
का आपलं हळवं मन प्रवृत्त करतंय आपल्याला वारंवार
कविता लिहायला?
याच विचारचक्रातून कवी पुन्हा लिहायला बसले आहेत कविता
आणि कदाचित विचार करताहेत पुन्हा live येऊन
आपण अद्यापही जीवंत असल्याचा पुरावा देत
चारचौघांना जीवंत असल्याचा अनुभव देण्याघेण्याचा
सध्या सर्वत्र एकच जोरदार चर्चा आहे
की कवी भरमसाठ कविता लिहिताहेत.
~ राजीव मासरूळकर
कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
का लिहिताहेत कवी भरमसाठ कविता?
ज्येष्ठ प्रथितयश पुरस्कारप्राप्त साहित्यिक
समाजमाध्यमावर येऊन पाहताहेत
की भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
आणि मुख्य म्हणजे तोंड वर करून पुन्हा पुन्हा live सादरीकरण करून का मांडताहेत उच्छाद?
हे हौसेनवसे कवी का इतक्या कविता लिहून बदनाम करीत आहेत कवीकुळाला?
दररोज हजारो लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असताना
मुकाट आसवं गाळत श्रद्धांजली अर्पण करत बसण्याऐवजी
घरात बसून का लिहिताहेत हे कवी उथळ वगैरे कविता?
या हौशानवश्यांच्या कवितांमुळे
चांगल्या कवितेचं होत असलेलं प्रचंड नुकसान
अस्वस्थ करीत आहे पुरस्कारप्राप्तवगैरे प्रस्थापित साहित्यिकांना..
समीक्षक पडले आहेत भयंकर पेचात
की का लिहित असावेत कवी भरमसाठ कविता?
का लिहिताहेत हे वेडे लोक हातोहात
डॉक्टर्सवर, पोलिसांवर, मजूरांवर, राजकारण्यांवर, दात्यांवर, प्राणीपक्ष्यांवर, निसर्गावर
सर्रास सहजसुलभ कविता?
का करीत आहेत दीर्घकाळापासून घराघरात कोंडलेल्या
हवालदिल हतबल सामान्य रसिकांचं
उठल्याबसल्या live येऊन मोफत मनोरंजन?
या संख्यात्मक वाढीचा किती जबरदस्त फटका बसेल आपल्या अभिजात वगैरे भाषेला?
स्वत:च्या घरात दाळदाणा असो नसो
संकटग्रस्तांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्याऐवजी,
घरात स्वस्थ बसून टीव्हीवर सतत मृत्यूचा सोहळा
निर्विकारपणे बघत बसण्याऐवजी
का लिहिताहेत कवी लोकांच्या वेदनेवर, मरणावर इतक्या कविता?
थांबवायचं तरी कसं या जमेल तसं सरळसरळ लिहित्या हातांना
या प्रश्नाने पार भंडावून सोडलं आहे काळामागे धावताना प्रचंड दमछाक होत असलेल्या समीक्षकांना
वृत्तपत्र, नियतअनियतकालिकांचे संपादक
विभिन्न प्रकारची पुस्तकं छापणारे प्रकाशक विचारताहेत
की का लिहिताहेत हे भरमसाठ कवी भरमसाठ कविता?
वृत्तपत्र, नियतकालिकं , पुस्तकं घरोघर पोहोचवण्यावर निर्बंध असताना
वाचक मिळण्याची शक्यता नसताना
का विनाकारण लिहिताहेत कवी इतकी सडकछाप कविता?
आम्ही छापतो त्यांची कविता न वाचता
का वाचाव्यात, पहाव्यात संकटग्रस्त रसिकांनी
या हौशानवश्या कवींच्या हलक्याफुलक्या, आक्रोश मांडणा-या, वेदना देणा-या चिल्लर कविता?
समाजमाध्यमांसारख्या आभासी जगात कविता व्हायरल करून
का आपला वेळ आणि उर्जा वाया घालवत आहेत हे असहाय जीव?
कवी स्वत:ही संभ्रमात आहेत
कि का लिहिताहोत आपण इतक्या कविता?
शक्य तितकी मदत केली
शक्य त्यांना आधार दिला
शक्य तितका ब्रेकिंग न्युजचा भडिमार सोसला
शक्य तितकं गुपचूप गुदमरत बसलोत घरात
सगळं जग घरात बसलेलं असतानाही
का घडताहेत बाहेर या प्रचंड हालचाली?
का जाताहेत हकनाक असंख्य निष्पाप जीवांचे बळी?
का पसरलं आहे घराघरांवर मृत्यच्या भयाचं सावट?
का नाही थांबत आपली वेदनादायी विचारप्रक्रिया?
का आपलं हळवं मन प्रवृत्त करतंय आपल्याला वारंवार
कविता लिहायला?
याच विचारचक्रातून कवी पुन्हा लिहायला बसले आहेत कविता
आणि कदाचित विचार करताहेत पुन्हा live येऊन
आपण अद्यापही जीवंत असल्याचा पुरावा देत
चारचौघांना जीवंत असल्याचा अनुभव देण्याघेण्याचा
सध्या सर्वत्र एकच जोरदार चर्चा आहे
की कवी भरमसाठ कविता लिहिताहेत.
~ राजीव मासरूळकर
No comments:
Post a Comment