दिंडी निघाली आहे पायी
दोनचार कच्च्याबच्च्यांच्या
एकदोन पिकल्या जीवांची पालखी करून
आयुष्याचं वृंदावन डोक्यावर घेत
कोसो दूर...
विटलेल्या लक्तरांच्या असंख्य पताका लोंबकळताहेत क्षीणपणे
स्वत:च्या जात, धर्म, पंथाची ओळख
उघडी पडू नये
याची काळजी घेत
दिंड्या निघाल्याहेत चहुबाजूंनी
अंधाराची, उजेडाची , ऊन, वारा, पावसाची
भुकेचीही तमा न बाळगता
सरकताहेत पुढे पुढे पुढेच
अबीर... गुलाल उधळण्याइतकी शक्ती उरलेली नाहीय
कुठल्याच हातात
मात्र थकल्याभागल्या अवस्थेतही
स्वाभिमानी जिद्दी पाय
तप्त रस्त्यांवर उमटवत आहेत
आत्मनिर्भर रक्ताचे लालबुंद ठसे
काळमार्गावरील मैलाचे दगड ठरत...
दरवर्षी असायचेच हमखास
इथेतिथे खुणावणारे हवेहवेसे मुक्काम
पण यावेळी मात्र रद्द झाले आहेत मधले सगळे मुक्काम
ठरलेल्या एकमेव मुक्कामाकडे
वारी करीत आहे बेधडक मार्गक्रमण
अधुनमधुन रंगत आहे
श्वासांच्या उभ्या आणि गोल रिंगणांचा अनुपम्य सोहळा
प्राणांचे प्रकाशवेडे अश्व
सजूनधजून उधळत आहेत चौखूर
हे असं रिंगणात उधळणं
म्हणजेच रिंगणातून खरी सुटका...
हे कळून चुकलंय
सगळ्याच अश्राप वारक-यांना
वारीचं हे आगळंवेगळं रूप अनुभवताहेत
वारीचा जिवंत अनुभव नसलेले असंख्य बिचारे लोक
घरबसल्या लोळत आळसावत साग्रसंगीत
ही वारी जातेय एखाद्या गडगंज किर्तीवंत तिर्थक्षेत्राकडे
असं म्हणावं
तर त्यांचे सर्व दरवाजे झालेयत कधीचेच कडेकोट कुलुपबंद...
ही वारी निघालीय
गाव नावाच्या तिर्थक्षेत्रातल्या
घर नावाच्या मंदिराकडे...
वारकरी करताहेत प्रचंड घाई
त्यांना पोहोचवायची आहे आपापली दिंडी
गंतव्यस्थळी वेळेत
गाभा-यातली महापूजा अनुभवण्यासाठी!
मात्र
महापूजा होणार की नाही
झालीच तर करणार कोण
हे काही ठरता ठरत नाहीये....!
~ राजीव मासरूळकर
दि.25 मे, 2020
औरंगाबाद
दोनचार कच्च्याबच्च्यांच्या
एकदोन पिकल्या जीवांची पालखी करून
आयुष्याचं वृंदावन डोक्यावर घेत
कोसो दूर...
विटलेल्या लक्तरांच्या असंख्य पताका लोंबकळताहेत क्षीणपणे
स्वत:च्या जात, धर्म, पंथाची ओळख
उघडी पडू नये
याची काळजी घेत
दिंड्या निघाल्याहेत चहुबाजूंनी
अंधाराची, उजेडाची , ऊन, वारा, पावसाची
भुकेचीही तमा न बाळगता
सरकताहेत पुढे पुढे पुढेच
अबीर... गुलाल उधळण्याइतकी शक्ती उरलेली नाहीय
कुठल्याच हातात
मात्र थकल्याभागल्या अवस्थेतही
स्वाभिमानी जिद्दी पाय
तप्त रस्त्यांवर उमटवत आहेत
आत्मनिर्भर रक्ताचे लालबुंद ठसे
काळमार्गावरील मैलाचे दगड ठरत...
दरवर्षी असायचेच हमखास
इथेतिथे खुणावणारे हवेहवेसे मुक्काम
पण यावेळी मात्र रद्द झाले आहेत मधले सगळे मुक्काम
ठरलेल्या एकमेव मुक्कामाकडे
वारी करीत आहे बेधडक मार्गक्रमण
अधुनमधुन रंगत आहे
श्वासांच्या उभ्या आणि गोल रिंगणांचा अनुपम्य सोहळा
प्राणांचे प्रकाशवेडे अश्व
सजूनधजून उधळत आहेत चौखूर
हे असं रिंगणात उधळणं
म्हणजेच रिंगणातून खरी सुटका...
हे कळून चुकलंय
सगळ्याच अश्राप वारक-यांना
वारीचं हे आगळंवेगळं रूप अनुभवताहेत
वारीचा जिवंत अनुभव नसलेले असंख्य बिचारे लोक
घरबसल्या लोळत आळसावत साग्रसंगीत
ही वारी जातेय एखाद्या गडगंज किर्तीवंत तिर्थक्षेत्राकडे
असं म्हणावं
तर त्यांचे सर्व दरवाजे झालेयत कधीचेच कडेकोट कुलुपबंद...
ही वारी निघालीय
गाव नावाच्या तिर्थक्षेत्रातल्या
घर नावाच्या मंदिराकडे...
वारकरी करताहेत प्रचंड घाई
त्यांना पोहोचवायची आहे आपापली दिंडी
गंतव्यस्थळी वेळेत
गाभा-यातली महापूजा अनुभवण्यासाठी!
मात्र
महापूजा होणार की नाही
झालीच तर करणार कोण
हे काही ठरता ठरत नाहीये....!
~ राजीव मासरूळकर
दि.25 मे, 2020
औरंगाबाद
No comments:
Post a Comment